नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
कोपरगाव – कोपरगाव शहराला पिण्याच्या पाणी प्रश्नावरून कायमच टांगती तलवार असून कोपरगाव वासीयांवर सतत अन्याय होत असून पहिले पाढे ५५ अशी गत झाली असून काल नगरपालिकेने ६ दिवसाआड पाणी देणार असल्याचे प्रसार माध्यम तून जनतेला कळवले. ही जनते बरोबर चेष्टा व छळ नगरपालिका करत आहे, ही खेदाची गोष्ट आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी मिळत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकांव्ये केला आहे.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/11/img_20221130_1124468026143786539881046-1024x988.jpg)
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, नागरिकांमध्ये विशेष करून महिला भगिनी मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . आत्ता महिनाभरापूर्वी पाऊस बंद झाला. गोदावरी दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहत आहे. नासिक भागातील सर्व धरण भरले आहेत . औरंगाबाद/ पैठण चे जायवाडी धरण पूर्ण भरून वाहिले .असे असताना नगरपालिका पाठबंधारे विभाग व कॅनॉल रिपेअर च्य्या नावाखाली स्वतः ची चूक झाकण्याचे प्रयत्न करीत आहे. 3 दिवसाआड म्हणजे ४ थ्या दिवशी पाणी देत असताना भरपूर पाण्याची नासाडी होत होती , मोठ मोठी लिकेज रोड वर चालू होती . त्या कडे लक्ष दिले नाही , तसेच पाटबंधारे विभागाने पाणी पूर्ण क्षमतेने भरून दिले नाही या नावाखाली स्वतः ची जबाबदारी लपवत आहे. शेतकरी सोंगणीचा काळ असल्याने पाणी भरत नव्हते , ते पावसाळा कंटाळले होते . आणि कॅनॉल ला पाणी तसेच चालू असताना , येसगाव चे सर्व तळे भरून न घेतल्याने , दुर्लक्ष केल्याने नागरिकांची आत्ता हाल होणार आहे.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/10/img_20221017_1926203927138575789739136.jpg)
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/08/IMG-20220804-WA0001.jpg)
लिकेजेस वाढल्याने घान पाणी येत आहे या कडे ही पालिकेचे दुर्लक्ष केले. पाणी पट्टी वाढवली आणि नाही भरले तर कनेक्शन नगरपालिका लगेच तोडते . हे मात्र न चुकता करतात.मग स्वच्छ पाणी व नियमित पाणी यात नगरपालिका का लक्ष देत नाही शासन त्यांना या साठी पगार देते . याच्या ही पगारात व भाढतीत कपात करावी म्हणजे कळेल की जनतेला पट्टी भरताना व नळ कनेक्शन तोडताना नागरिकांना काय त्रास होतो.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/Adv-Vighnaarta.jpg)
कोपरगाव मधील बहुतांशी जनता संजय नगर , सुभाष नगर , गांधी नगर , टिळक नगर , नदी काठ, खडकी इत्यदी झोपडपट्टी भागात राहतात , तेथील भागातील महिला भगिनी ची खूप हाल आत्ता होणार आहे , कसे पाणी साठवायचे हा प्रश्न पडत आहे. आधीच पिण्यासाठी कॅन घ्यावे लागत आहे , याचा ही भुर्दंड जनतेच्या वाट्याला येत आहे. आणि आत्ता आठवड्यातून १ दिवस पाणी . नागरिक जर बोलले नाहीत तर असे होत राहणार .बोलून कशाला वाईट व्ह्यायचे असे जर जनता गप्प राहिली तर असेच होतं राहणार.असेही माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील शेवटी म्हणाले.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/Adv-jyoti-4.jpg)