8.5 C
New York
Thursday, April 18, 2024

समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

कोपरगाव –  सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ. १० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१० वीत अथर्व बेरगळ आणि हर्ष कासलीवाल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तर तनिषा जैन हिने ९६.४ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गणेश गवळी आणि आयुष जोर्वेकर यांनी ९५.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला तर इ.१२ वीत श्रुतिका देशमुख हिने ९५ टक्के, ओम जाधव आणि प्रीती परदेशी यांनी ९४.२ तर गार्गी कदम हिने ८८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी ठरत इ.१० वी आणि इ.१२ वीचा समता स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.

समता इंटरनॅशनल स्कूल मधील ६ विद्यार्थी ९५ टक्केच्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यात अथर्व बेरगळ, हर्ष कासलीवाल, तनिषा जैन, गणेश गवळी, आयुष जोर्वेकर, सोनल अहिरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.९० ते ९५ टक्केच्या दरम्यान स्वरूपा दास, पलक भुतडा, दिवा सांड, संजना विभुते, भावेश बोथरा, समर्थ शिंदे, साईश कथले, युग लोढा, सुधांशु आदिक या ९ विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादन केले आहे. गणित विषयात अथर्व बेरगळ याला १०० पैकी १०० गुण मिळाले आहे तर समाजशास्त्र विषयात सोनल अहिरे, संजना विभुते यांनी १०० पैकी  १०० गुण मिळविले आहे. इ.१२वीच्या विज्ञान शाखेतील प्रीती परदेशी हिने कॉम्प्युटर सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.

‘समता इंटरनॅशनल स्कूलची ही इ.१० वीची ७ वी बॅच असून या वर्षीच्या निकालासह जिल्हयात अग्रगण्य राहण्याची परंपरा कायम राखत समता पॅटर्न यशस्वी ठरला आहे. हा निकाल म्हणजे समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक घेत असलेल्या कष्टाचे फळ असून समता इंटरनॅशनल स्कूलच्या यशाची पावती आहे.या वर्षी ही समताच्या विद्यार्थ्यांनी २०२२-२३ च्या इयत्ता १० वी आणि १२ वी सी.बी.एस.ई.निकालात उत्तुंग भरारी मारली आहे.’असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी केले.

तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थी केंद्रित शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे.आम्ही  विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवत असतो. ‘Leave No Child Behind’ स्कूलच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता १ली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १० वी ला आल्यानंतर गरज व गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या  कष्टाचेच  फळ आहे’.

या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा , उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles