Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    Challenge and Inspire Future of Political Thought

    By NK_Admin

    Opinions That Analyze, Critique, and Insights Into Policy Matters

    By NK_Admin

    शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

    By NK_Admin

    संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

    By NK_Admin

    Opinions That Illuminate Nuances and Assumptions in the Political

    By NK_Admin

    January 21, 2023

    By NK_Admin
  • Politics

    पत्रकार शशिकांत  वारिशे यांच्या अपघाती मृत्युच्या घटनेची चौकशी करण्याची पत्रकारांची मागणी

    By NK_Admin

    नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

    By NK_Admin

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin
  • Health

    काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

    By NK_Admin

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin

    कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी भाउसाहेब लोहकरे यांची निवड

    By NK_Admin

    Catching Every Beat of World News as it Happens

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशेतीसमस्या

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे

NK_Admin
Last updated: March 1, 2023 5:57 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याची नितांत गरज असून, हे लक्षात घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नये. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच सरकारने याबाबत महावितरण कंपनीला निर्देश द्यावेत, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

गतवर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामात पिके घेतली. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढते आहे. उन्हामुळे आणि जमिनीतील खालावत चाललेली पाण्याची पातळी यामुळे पिके करपू लागली आहेत. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळ पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने जे काही थोडेफार पाणी आहे तेही शेतकऱ्यांना देता येत नाही. शेतातील उभ्या पिकांना शेवटच्या पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी रब्बी पिके हातातून जाण्यासारखी परिस्थिती आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. पिकांना पाणी देण्याची आणि त्यासाठी विजेची गरज आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून, अशा अडचणीच्या काळात महावितरण कंपनीने त्यांना साथ देण्याची गरज आहे.

कृषिपंपाचे थकलेले वीजबिल वसूल करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याकरिता थेट विद्युत रोहित्रे (डी. पी.) बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वीज वितरण कंपनीने किमान पंधरा-वीस दिवस अगोदर पूर्वसूचना देऊन शेतकऱ्यांचा डी. पी. वरील विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक होते. वीज नियामक आयोगाने तसे आदेश दिलेले आहेत.

तसेच शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन तोडू नये, असा न्यायालयाचाही आदेश आहे. वीज वितरण कंपनीने थेट विद्युत रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन विद्युत रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनीने तात्काळ थांबवावी, अशी मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.

अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांना फटका बसून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यात आता रब्बी पिके शेवटच्या पाण्यावर आलेली आहेत. गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या आवर्तनाअभावी लाभक्षेत्रातील हातातोंडाशी आलेली गहू, कांदा, हरभरा व इतर पिके धोक्यात आली होती नुकतेच आता नुकतेच गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून शेतकरी आपल्या शेतातील विहिरी, शेततळे भरून घेऊन सिंचन पूर्ण करतील. आवर्तनामुळे कोरडे पडलेले लहान-मोठे तलाव, विहिरी तसेच बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांना शेवटच्या पाण्याची आवश्यकता आहे. पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर ही पिके उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई न करता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा तसेच विद्युत रोहित्रांवरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवावी, अशीही मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गतिशील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे.

जर ही पिके शेतकऱ्यांच्या हाती आली तर मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी कृषिपंपांची वीजबिले भरू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ध्यानात घेऊन शेतीसाठी योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश सरकारने विद्युत वितरण कंपनीला द्यावेत. तीन महिने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा यापूर्वीचा निर्णय या काळात कायम करावा. तसेच आजघडीला संपूर्ण थकित वीजबिल भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत नसल्यामुळे महावितरण कंपनीने सध्या शेतकरी थकित वीजबिलापोटी जेवढे पैसे भरण्यास तयार आहेत तेवढे पैसे स्वीकारावेत. ही पिके व्यवस्थित होऊन त्यातून नंतर उर्वरित वीजबिल भरन्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. महावितरण कंपनीने सामंजस्याने यातून मार्ग काढावा व अंतीम पाण्यावर असलेली पिके व्यवस्थित सिंचन होण्यास सहकार्य करावे अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसवावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
Next Article लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it incorrectly and…

By NK_Admin

वाढत्या हद्द वाढीचा व शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे बजेट सादर करावे – मंगेश पाटील

कोपरगाव - नगरपालिका ही शासनाची सेवा व विकास करणारी / देणारी स्थानिक स्वराज्य संस्था (…

By NK_Admin

समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील – विजय बोरुडे, तहसिलदार

समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील - विजय बोरुडे, तहसिलदार कोपरगाव : बाल…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?