Friday, 16 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त

    By NK_Admin

    समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

    By NK_Admin

    Gastronomic Delights Explored in Culinary Expeditions Around the World

    By NK_Admin

    आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

    By NK_Admin
  • Politics

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

    By NK_Admin

    कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

    By NK_Admin

    Strategies for Accessible and Inclusive Healthcare

    By NK_Admin

    विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    By NK_Admin

    १९ कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin
  • Health

    संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin

    राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ -आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    ओमप्रकाश काका कोयटे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

    By NK_Admin

    आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रराजकीय

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

NK_Admin
Last updated: February 10, 2023 3:50 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. अतिवृष्टीने आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून, कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यास त्याचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरू असलेली ही सक्तीची वीज बिल वसुली व वीज तोडण्याची मोहीम तातडीने थांबवून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे की, सध्या शेतात रब्बी, उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित असलेल्या वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.

रब्बी पिकांना शेवटचे पाणी देण्याची वेळ आली असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल थकले म्हणून कृषिपंपाची वीज तोडत आहेत. महावितरण कंपनीकडून कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गतवर्षी पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीने झोडपल्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्न करत आहे. सध्या शेतात रब्बी पिके उभी असून, या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे; परंतु थकित वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी आधीच अनियमित आणि कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यात सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडल्यास त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असून, विजेअभावी पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांवर वीजबिल आले आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे व आर्थिक अडचणींमुळे सध्या हे वीजबिल शेतकरी भरू शकत नाहीत. महावितरण कंपनीने वीजबिलाची थकबाकी दोन हप्त्यात भरण्याची सवलत दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, याकडे स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना किमान पंधरा दिवस अगोदर सूचना दिली पाहिजे. मात्र, तसे न करता महावितरण कंपनीचे अधिकारी व्हॉटसअॅपवर इंग्रजी मेसेज पाठवतात. सर्व शेतकरी सुशिक्षित नाहीत. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. ते व्हॉटसअॅप वापरत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ते समजू शकत नाही. ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

महावितरणने थकित वीजबिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. महावितरणने शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि त्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article वाढत्या हद्द वाढीचा व शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे बजेट सादर करावे – मंगेश पाटील
Next Article गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Analyzing the Intersection of Politics and Societal Impact

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it…

By NK_Admin

गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव - संविधान चौक टिळक नगर फाउंडेशन च्या वतीने भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात…

By NK_Admin

ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक

ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?