Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारेमिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर

    By NK_Admin

    महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे

    By NK_Admin

    संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

    By NK_Admin

    समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलिसांची वाढदिवसानिमित्त केली आरोग्य तपासणी

    By NK_Admin

    श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

    By NK_Admin
  • Politics

    आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

    By NK_Admin

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

    By NK_Admin

    शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

    By NK_Admin

    Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

    By NK_Admin

    महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे

    By NK_Admin
  • Health

    Crafting Daily Habits for Long-term Health and Happiness

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin

    दुय्यम कारागृहातील खतरनाक 35 आरोपी हरसुल कारागृहात वर्ग

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    By NK_Admin

    पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    Class Efforts in Safeguarding and Restoring Historic Monuments

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

NK_Admin
Last updated: February 10, 2023 4:20 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. मात्र, सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे, या पिकांना पाणी वेळीच पाणी न मिळाल्यास पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करून गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेच्या म्हणजे १ मार्चच्या आधी १५ फेब्रुवारीपर्यंत आवर्तन सोडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. 

जलसंपदा (पाटबंधारे) विभागाने घेतलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन (रोटेशन) देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.

यावर्षी धरण क्षेत्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्याला रब्बी हंगामात एक आणि उन्हाळी हंगामात तीन असे चार आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार नियोजित वेळापत्रकाप्रमाणे यातील पहिले रब्बीचे आवर्तन हे १ जानेवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र, बिगरसिंचनासाठी व सिंचनासाठीचे आवर्तन पाच दिवस अगोदरच सोडण्यात आले होते.

पूर्वी रब्बी हंगामातील आवर्तन ३० ते ३५ दिवस चालायचे; परंतु यंदा रब्बीचे आवर्तन कमी दिवस चालले. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडला. शेतकऱ्यांची पिके शेतात उशिरा उभी राहिली. पावसामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात विहिरींना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यांचे पाणी शेतीसाठी वापरले नाही. त्यात कालवे म्हणजे आवर्तन लवकर बंद झाले. 

सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे. गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. जर पाटबंधारे खात्याने ठरल्याप्रमाणे १ मार्चला आवर्तन सोडले तर ४ मार्चपर्यंत पाणी खालपर्यंत येईल आणि हे आवर्तन पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी जाईल. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक लागणार नाही.

ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेला म्हणजे १ मार्चला आवर्तन सोडण्याऐवजी त्याच्या अगोदर आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेच्या आधी १५ फेब्रुवारीच्या आत आवर्तन सोडावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.   

सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका व इतर पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढत असून,  सध्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. जर पिकांना पाणी मिळाले नाही तर पाण्याअभावी पिके वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन गोदावरी डावा व उजवा कालव्याला १ मार्चपूर्वी लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे. गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडल्यानंतर आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत. हे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालवे बंद करू नयेत. टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे. पाटबंधारे विभागाने लवकर आवर्तन सोडून पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे. नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही कोल्हे यांनी केली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 
Next Article समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

फार्मसी शिक्षण  क्षेत्रात येणाऱ्या काळात होणार बदल  – डाॅ. मोंटूकुमार पटेल

संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषदेचे उदघाटन कोपरगांवः फार्मसी कौन्सिल ऑफ  इंडिया येणाऱ्या  काळात फार्मसी शिक्षण…

By NK_Admin

समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे

कोपरगाव : महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेने ३१ डिसेंबर २०२३ वर्षाखेरीस ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा…

By NK_Admin

आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

कोपरगाव :- कोपरगाव शहरात मुस्लीम बांधवांनी ‘बकरी ईद’ सण मोठ्या उत्साहात साजरा केला असून आ. आशुतोष काळे…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?